ठाणे, दि. ४ डिसेंबर २०२२
महाराष्ट्र लोकाधिकार समिती व समता मानव सेवा संस्था यांचे संयुक्त कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रम सोहळा संपन्न.
वर्तक नगर, ठाणे येथे महाराष्ट्र लोकाधिकार समिती व समता मानव सेवा संस्था यांचे संयुक्त कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे प्रदेशाध्यक्ष मा. प्रसादजी करंदीकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार मा.आबासाहेब चासकर, मा.राजेशजी कांबळे – आय कॉरनेल बिजनेस स्कूल यू.एस.ए., मा.मधुकरजी देसाई – फाउंडर अँड नॅशनल प्रेसिडेंट स्वमन सोशल हुमन, मा.विनायक सोळसे – मुख्य संपादक संवाद महाराष्ट्र न्यूज चैनल व साप्ताहिक गुन्हे नगरी, मा.राजारामजी ढोलम – कोकण विभाग अध्यक्ष अखिल भारतीय ओबीसी महासभा, माजी महापौर मा.मनोहरजी गाढवे, मा. मधुकरजी मोरे – कोकण विभागीय उपाध्यक्ष महाराष्ट्र लोकाधिकार समिती, मा. प्रदीपजी शिंदे – ठाणे शहर प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मा. विकासजी गायकवाड अध्यक्ष ठाणे शहर जिल्हा पीपल्स रिपब्लिकन पार्टी, मा. अनिलजी भोईर – शाखाप्रमुख वर्तक नगर बाळासाहेब ठाकरे शिवसेना म्हणून उपस्थितीत होते.कार्यक्रमाची सुरुवात बळी पुजनानी झाली.कार्यक्रमात प्रमुख पाहुणे चासकर यांनी संघटनेचा व संस्थेचा घेतलेला अनुभव सांगताना म्हणाले खरोखरच सर्वसामान्य जनतेला जे कर्जदार, कर्जास जमीनदार राहिले आहेत अशा व्यक्तीवर ज्या बेकायदेशिर कारवाई होतात यावर कोणीच आवाज उचलत नाही आणि ते काम प्रदेश अधक्ष ॲड. करंदीकर साहेब यांच्या मार्गदर्शनातून ठाणे जिल्हाध्यक्ष तथा संघटक म्हणून जबाबदारी स्वीकारलेले धनाजी सुरोसे हे करतात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. नंतर आलेल्या मान्यवरांनी संघटनेच्या व संस्थेच्या कार्यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.त्यानंतर ॲड. करंदीकर साहेबानी संघटनेच्या कार्याची महती सांगताना म्हणाले जो पर्यंत आपल्यावर होत असलेला अन्याय आपण स्वतः सहन नकरता समोर जाऊन त्यास सडेतोड जाब वीचारत नाही तो पर्यंत समोरचा व्यक्ती आपल्यावर अन्यायच करणार ! प्रत्येक व्यक्ती कर्ज घेतो तो काही मौज म्हणून नाही अडीअडचणीला घेतलेल्या कर्जावर वसुलीसाठी बेकायदेशीर कारवाई करतात यावीषयावर अशावेळी कोणीच बोलायला मागत नाही याचाच अर्थ असा की यावर कोणतेच संघटन काम करीत नाही ते काम फक्त आणि फक्त महाराष्ट्र लोकाधिकार समिती करीत यासाठी सर्वांनी एकत्रितरित्या येणे काळाची गरज आहे. शेवटी आलेल्या सर्व मान्यवर, पदाधिकारी यांचे स्वागत समता मानव सेवा संस्थेच्या महिला प्रदेशाध्यक्षा श्रीमती मनीषा बेलोसे, महिला महासचिव श्रीमती सुजाता सांडभोर, महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश कदम, ठाणे शहर अध्यक्ष राजेश बामणे,उपाध्यक्ष अशोक देवकर, सचिव सचिन यादव, राजन जाधव, ठाणे शहर अध्यक्षा श्रीमती संध्या मस्कर, ठाणे शहर उपाध्यक्षा श्रीमती रोहिणी निंबाळकर, शंतनु मोरे, विनोद देशमुख, अफाक अन्सारी यांनी केली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा संघटक महाराष्ट्र राज्य धनाजी सुरोसे यांनी केले. सरतेशेवटी कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.

So good