बीड 12 डिसेंबर (प्रतिनिधी) : आज माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. त्यानिमित्त दरवर्षी प्रमाणे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर कार्यक्रम घेतला. यावेळी त्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जयंतीनिमित्त मौन बाळगळ त्यानंतर त्यांनी आपण मौन का बाळगलं? याचं कारणंही सांगितलं.
यावेळी त्या म्हणाल्या, ‘ लोकांना, मिडीयाला वाटलं असेल असं का केलं? तर हे मौन बाळगण्यामागचं कारण म्हणजे ज्या ठिकाणी बचबच झाली आहे त्याठीकाणी मौन बाळगणे गरजेचे असते. तेच खरे मुंडे साहेबांचे संस्कार आहेत. असं त्यांनी सांगितलं. गेल्या काही काळातील अप्रिय घटनांवर हे मौन होत, ते कोणा एका व्यक्ती विरूद्ध नव्हतं असंही त्या म्हणाल्या.
त्याचबरोबर पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला काही तरी मिळवायचं म्हणून मी कुणासमोर जाण्याचे कारण नाही. मला काय मिळवायचे ते मी मिळवेन. मुंडे साहेबांचे प्रत्येक स्मरण ऊर्जा देते. सगळे सोडून संन्यास घ्यावा वाटतो, पण जेव्हा एक छोटी मुलगी गोपीनाथ मंडे साहेबांवर गाणं म्हणते. एखादी मुलगी भाषण करते. तेव्हा हे मिळवले ते कुठल्याही पद प्रतिष्ठेपेक्षा मोठे वाटते.
