नवी दिल्ली

नवी दिल्ली, दि. 3 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या भारत जोडी यात्रेचा तिसरा दिवस आहे. रविवारी संध्याकाळी...
नवी दिल्ली, दि. 30 सप्टेंबर (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातची राजधानी गांधीनगर आणि मुंबई सेंट्रल...
नवी दिल्ली, दि. 22 सप्टेंबर (प्रतिनिधी) : भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे....
नवी दिल्ली, दि. 21 सप्टेंबर, चित्रलेखा(प्रतिनिधी) :प्रसिद्ध विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव यांचं वयाच्या 59 व्या वर्षी निधन...
नवी दिल्ली, 14 सप्टेंबर, चित्रलेखा रासने (प्रतिनिधी) : 5G नेटवर्कची सेवा लवकरच भारतात सुरु होणार आहे. कारण...
नवी दिल्ली 11सप्टेंबर(प्रतिनिधी) : लंपी व्हायरसने देशभरात 58 हजारांहून अधिक गायींचा बळी घेतला आहे. राजधानी दिल्लीतही या...
नवी दिल्ली, 8 सप्टेंबर प्रतिनिधी : केंद्र सरकार ऑक्टोबरपासून ऑटो कंपन्यांसाठी आठ आसनी वाहनांमध्ये किमान सहा ‘एअरबॅग’...
नवी दिल्ली, दि.7– दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात  ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचाशुभारंभ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आला.  येथील कस्तुरबा गांधी मार्गस्थित नवीन महाराष्ट्र सदनात सकाळी राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते ‘घरोघरी तिरंगा’(हर घर तिरंगा) या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी माजी खासदार हरिभाऊ राठोड, राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, सचिव तथा आयुक्त (गुंतवणूक  व राजशिष्टाचार) निवासी आयुक्त (अ. का.) डॉ.निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश आडपवार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा, यांच्यासह महाराष्ट्र सदन व परिचय केंद्राचे अधिकारी कर्मचारी तसेच महाराष्ट्र सदन येथे निवासी असलेले अभ्यागत मोठ्या संख्येने उपस्थित होते.             यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी ध्वज उंचावून ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानाचा रितसर शुभारंभ करुन महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानाला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्थित मुख्य सचिव श्रीवास्तव, श्रीमती पांडे यांच्यासह उपस्थितांनीही ध्वज उंचावून ‘वंदे मातरम्’ , ‘भारत माता की जय’ या घोषणा दिल्या. या घोषणांनी महाराष्ट्र सदन  निनादले.              दिल्लीत मराठी भाषीक लोकांची जवळपास अडीच लाख लोकसंख्या असून, हे लोक दिल्ली व परिसर क्षेत्रात वास्तव्यास आहेत. या सर्वांची नाळ महाराष्ट्राशी जुळलेली असून  राज्यात साजरे केले जाणारे सण, उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम येथेही सार्वजनिकरित्या साजरे केले जातात. महाराष्ट्र शासनाच्या दिल्ली स्थित कार्यालयांच्या समन्वयातून यांना एकत्रित करुन अनेकदा कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन केले जाते.  ‘घरोघरी तिरंगा’ (हर घर तिरंगा) या अभिनव उपक्रमा अंतर्गत दिल्ली  स्थित विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मराठी भाषीक मान्यवरांच्या हस्ते ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचे महत्व पटवून, या अभियानाचा प्रचारमहाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाजमाध्यमांवरुन प्रसृत  करण्यात येणार आहे.