ठाणे, दि. १० : सध्या मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक, डिजीटल अशा विविध प्रकारची माध्यमे संक्रमणावस्थेतून जात असून त्यांनी तत्व आणि ध्येय न...
उल्हासनगरातील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहासाठी भाडेतत्वावरील इमारतीसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन ठाणे, दि.10  : समाज कल्याण विभागाच्या वतीने उल्हासनगर येथे...
एकूण निर्णय-3 नगर विकास विभाग मुंबई मेट्रो मार्गिका-3 च्या सुधारित प्रस्तावास मान्यता             कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मुंबई...
ठाणे, दि. 9 – स्वातंत्र्य मिळविण्यात स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान आहे. त्याप्रमाणे स्वातंत्र्यानंतर गेल्या ७५ वर्षात देश बलशाली करण्याचे श्रेय...
ठाणे, दि. 9 चित्रलेखा रासने(प्रतिनिधी) : दि.9 ऑगस्ट 2022 रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून कल्याणमध्ये महाराष्ट्र...
ठाणे, दि. 8 : विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल वागळे इस्टेट येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला राज्य सरकारचा मुंबई विभागस्तरीय...
नवी दिल्ली, दि.7– दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात  ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचाशुभारंभ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आला.  येथील कस्तुरबा गांधी मार्गस्थित नवीन महाराष्ट्र सदनात सकाळी राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते ‘घरोघरी तिरंगा’(हर घर तिरंगा) या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी माजी खासदार हरिभाऊ राठोड, राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, सचिव तथा आयुक्त (गुंतवणूक  व राजशिष्टाचार) निवासी आयुक्त (अ. का.) डॉ.निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश आडपवार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा, यांच्यासह महाराष्ट्र सदन व परिचय केंद्राचे अधिकारी कर्मचारी तसेच महाराष्ट्र सदन येथे निवासी असलेले अभ्यागत मोठ्या संख्येने उपस्थित होते.             यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी ध्वज उंचावून ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानाचा रितसर शुभारंभ करुन महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानाला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्थित मुख्य सचिव श्रीवास्तव, श्रीमती पांडे यांच्यासह उपस्थितांनीही ध्वज उंचावून ‘वंदे मातरम्’ , ‘भारत माता की जय’ या घोषणा दिल्या. या घोषणांनी महाराष्ट्र सदन  निनादले.              दिल्लीत मराठी भाषीक लोकांची जवळपास अडीच लाख लोकसंख्या असून, हे लोक दिल्ली व परिसर क्षेत्रात वास्तव्यास आहेत. या सर्वांची नाळ महाराष्ट्राशी जुळलेली असून  राज्यात साजरे केले जाणारे सण, उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम येथेही सार्वजनिकरित्या साजरे केले जातात. महाराष्ट्र शासनाच्या दिल्ली स्थित कार्यालयांच्या समन्वयातून यांना एकत्रित करुन अनेकदा कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन केले जाते.  ‘घरोघरी तिरंगा’ (हर घर तिरंगा) या अभिनव उपक्रमा अंतर्गत दिल्ली  स्थित विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मराठी भाषीक मान्यवरांच्या हस्ते ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचे महत्व पटवून, या अभियानाचा प्रचारमहाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाजमाध्यमांवरुन प्रसृत  करण्यात येणार आहे.